Total Pageviews

Saturday, February 15, 2025

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न



 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,

अर्थशास्त्र विभाग 

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s  Seminar व समूह चर्चा संपन्न  

दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए. च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील  विध्यार्थ्यांचे सेमिनार व समूह चर्चा आयोजित केले होते. या सेमिनार व समूह चर्चे  मध्ये विध्यार्थ्यानी उस्फुर्तपणे सहभाग घेवून विविध चालू आर्थिक घडामोडींवर आपले विचार मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

खालील महत्वाच्या विषयांवर विध्यार्थ्यानी आपले सेमिनार  सादर केले व याच विषयांच्या बाबत समूह चर्चा देखील घडवून आणण्यात आली.  

१. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र 

२. कल्याणकारी अर्थशास्त्र व शासनाच्या  वर्तमान योजना 

३. कृषी अर्थशास्त्र  व वर्तमान कृषिविषयक धोरण 

४. विकासाचे अर्थशास्त्र व भारताची विकासाची सध्यस्थिती 

५. सार्वजनिक उत्पन्न - खर्च व  वर्तमानात सार्वजनिक खर्चात होत असलेली वाढ 

६. बँकिंग व फायनान्स आणि रोजगार संधी 

७. भारतीय अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेसमोरील  आव्हाने 

या प्रसंगी विभागातील प्राध्यापक डॉ. मनोरमा पवार व विभाग प्रमुख डॉ दीपक भारती यांची उपस्थिती होती.

निवडक videos 





निवडक छायाचित्रे 



















दिनांक ०४/०९/२०२४ रोजी विभागाच्या वतीने Student`s  Seminar व समूह चर्चा  आयोजनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सेमिनारचे विषय व सादरीकरण करताना आवश्यक घटकांची चर्चा व त्याबाबतचे मार्गदर्शन अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  करण्यात आले. 




 

Tuesday, February 11, 2025

मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे ३७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप संपन्न : दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५

 सामान्य लोकांना सोप्या भाषेत अर्थशास्त्र समजून सांगणे, ही अर्थशास्त्र अभ्यासकांची खरी जबाबदारी आहे...

आ. सतीश चव्हाण, सरचिटणीस, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर 


यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ३७ वे मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न.


 अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई आणि मराठवाडा अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३७ व्या मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन संपन्न झाले. या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण हे होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी अशा अधिवेशनामधून अर्थविषयक महत्वपूर्ण चर्चा संपन्न होतात, तेव्हा धोरणकर्ते व  नियोजनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पदाधिकारी यांना अशा अधिवेशनात  सहभागी करून घेतल्यास या  अर्थपूर्ण चर्चेचा फायदा  मराठवाड्याचे, राज्याचे व देशाचे आर्थिक धोरण सुनिश्चित करण्यास अधिक मदत होईल. मराठवाड्यातील शेतीचे प्रश्न, भारतातील दारिद्र्य व  विकासातील महिलांचा सहभाग असे महत्त्वपूर्ण विषय व त्यासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी अधिवेशनामधून होणाऱ्या चर्चेचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले.

प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून गोखले अर्थशास्त्र संस्था  पुणे येथील सहयोगी प्राध्यापक मा. डॉ. प्रकाश व्हनकडे हे उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रातील तथा मराठवाड्यातील १९४७ पासून ते आजतागायत भेडसावणारा आर्थिक प्रश्न, आर्थिक स्थिती यासंदर्भात अभ्यासपूर्ण आकडेवारीसह विवेचन केले. पूर्वी शेतीवर अवलंबून असणारा घटक बऱ्यापैकी आपला उदरनिर्वाह करायचा परंतु सद्यस्थितीत शेतीक्षेत्र कमी कमी होत गेल्यामुळे त्यातून आर्थिक विकास साधणे अशक्य होत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य मा. दत्तात्रय पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दहा वर्षांपूर्वी शेतीमालाला असणारा भाव आजही तोच आहे ही फार मोठी शोकांतिका आहे अशा स्वरूपाचे स्थिती असेल तर शेतकरी अथवा शेती संदर्भातील घटक आर्थिक प्रगती करू शकणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

            मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यामागील भूमिका व्यक्त करताना प्रास्ताविक मांडताना  डॉ. दीपक भारती यांनी विशेष करून मराठवाड्यातील आर्थिक प्रश्नावर सविस्तर चर्चा आणि विविध आर्थिक - सामाजिक समस्यांवर विचारमंथन व्हावे व त्यासाठी उपाययोजना सुचविता याव्यात या उद्देशाने प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक यांच्यासाठी प्रस्तुत अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याचे मत व्यक्त केले. 

 

समारोपापूर्वी डॉ. जी. एस. कल्याणकर व्याख्यानमाला अंतर्गत डॉ. सुरेश मैंद, अर्थशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ मुंबई यांचे भारताचा  शाश्वत कृषी विकास: आशावाद व आव्हाने या विषयावर महत्वपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.

या राष्ट्रीय अधिवेशनात निबंध वाचक, अधिवेशनात सहभागी प्रतीनिधिमधून  डॉ. बाबू  तोटरे, प्रा. डॉ. अनिल वाडकर, प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व यशस्वी आयोजनाबाबत संस्थेचे व  महाविद्यालयाचे कौतुक केले. प्रस्तुत राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने आलेल्या 250 पेक्षा अधिक शोधनिबंधाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच त्या शोधनिबंधांपैकी उत्कृष्ट शोधनिबंध लिहिणाऱ्या संशोधक, प्राध्यापकांचा यावेळी गौरव करण्यात आला.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ गणेश गावंडे यांनी करून दिला. यावेळी विचारमंचावर मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम सोलंकर,  महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.नरेंद्र काळे, श्री माणिकराव बावणे, प्रा. अरुंधती पाटील, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे  नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विलास खंदारे, मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे डॉ दिनकर टकले, डॉ शिवाजी पाते, डॉ. अर्जुन मोरे सर्व जिल्हा कार्यकारिणी, आयोजक प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, संयोजक डॉ. दीपक भारती यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अहिल्या बरुरे यांनी केले. या राज्यस्तरीय अधिवेशनास मराठवाड्यातील तसेच राज्यातील प्राध्यापक, अभ्यासक व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनाच्या आयोजनात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

                    उद्घाटन सोहळ्याचे विविध वृत्त वाहिन्या,  युट्युब चॅनेल व वर्तमानपत्र यांनी घेतलेली दखल

                                                अंबाजोगाई Mirror 

                                           YASHWANTRAO CHAVAN COLLEGE AMBAJOGAI 



वर्तमानपत्रातील बातम्या 



समारोप  सोहळ्यातील निवडक छायाचित्रे 



























































अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...