यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई,
अर्थशास्त्र विभाग
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar संपन्न
दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए. च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विध्यार्थ्यांचे सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनार मध्ये विध्यार्थ्यानी उस्फुर्तपणे सहभाग घेवून विविध चालू आर्थिक घडामोडींवर आपले विचार मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
खालील महत्वाच्या विषयांवर विध्यार्थ्यानी आपले सेमिनार सादर केले व याच विषयांच्या बाबत समूह चर्चा देखील घडवून आणण्यात आली.
१. भारतीय अर्थव्यवस्था
२. सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र
३. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
४. बँकिंग व वित्त
५. विकासाचे अर्थशास्त्र
या प्रसंगी विभागातील प्राध्यापक, संशोधक विध्यार्थी व विभाग प्रमुख डॉ दीपक भारती यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment