Total Pageviews

Monday, February 6, 2023

सामाजिक संशोधन (Social Research) -अर्थ, व्याख्या

 





 




प्रस्तावना -

कोणतीही घटना सहजा - सहजी घडत नाही, प्रत्येक घटनेला एक विशिष्ठ कार्यकारणभाव असतो. असा कार्यकारणभाव तपासण्याच्या प्रक्रियेतूनच वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होतो. विशेषतः जगात औदयोगिक क्रांतीनंतरच्या कालखंडात ही प्रक्रिया प्रभावीपणे सुरु झाली असे म्हणता येईल.१६ व्या व १७ व्या शतकात शास्त्रीय संशोधन कसे करावे तसेच शास्त्रीय संशोधन कसे असावे याबाबत चिन्तन झाल्याचे लक्षात येते. औदयोगिक क्रांती व तांत्रिक क्रांती नंतरच्या काळात मानवी जीवनात व आधुनिक समाजात दिवसेंदिवस सतत गुंतागुंत वाढत आली असल्याचे लक्षात येते. यामध्ये भर म्हनुन कि काय जगामध्ये सातत्याने बदलांची मालिकाच सुरु झाल्याची पाहावयास मिळते. या बदलांमधूनच आज समाजात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्याच्या आढळतात.संशोधन नसेल तर अश्या प्रकारच्या समस्या सोडवणे खूप गुंतागुंतीचे ठरले असते. परंतु संशोधनाच्या माध्यमातून मानव समस्या सोडवण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करत आला असल्याचे इतिहासावरून लक्षात येते. संशोधन म्हणजे एक असा प्रयत्न कि ज्या माध्यमातून सत्याचा शोध घेणे होय  किंवा एखाद्या विशिष्ट समस्येचे  उत्तर शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा  उपयोग होय. विकसित तंत्रज्ञानाच्या सोबतीने शास्त्रीय पद्धतीच्या मदतीने संशोधनाच्या माध्यमातून आज मानवाच्या वेगवेगळया समस्या सोडवणे शक्य होऊ लागले आहे.

सामाजिक संशोधनाचा अर्थ व व्याख्या विस्ताराने पाहण्यसाठी खालील लिंक ला click करावे ...

click hereसामाजिक संशोधन - अर्थ व व्याख्या -


विध्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी खालील लिंक चा देखील उपयोग करावा 






दीपक भारती 
अर्थशास्त्र विभाग 






Wednesday, February 1, 2023

मोबाइल...इंटरनेट आणि डेटा याचा योग्य वापर- विचार व कृती करण्याची वेळ


विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा मानवाच्या एकूणच विकासात खूप मोलाचा वाटा असला तरी देखील, याच विज्ञान व तंत्रज्ञान युगात इंटरनेटचा प्रसार व त्याचा उपयोग करण्यासाठी लागणारी  शिदोरी म्हणजे डेटा होय.  डेटा खरेदी करून तो संपवणे ही सवय  कंपन्यांनी त्यांच्या फायद्यासाठी सर्वच वयोगटाील लोकांना  लावली. हा डेटा कसा संपवायचा याबाबत कोणाचेच नियंत्रण मात्र दिसत नाही.  ही सवय हळू हळू स्पर्धेत  ( विशेषतः तरुण वयोगटात) रूपांतरित होत आहे. ज्याचे अनेक दुष्परिणाम विद्यमान पिढीला भोगावे लागत आहेत. भविष्यात या परिणामांची दाहकता अजून वाढू शकते.  वेळीच याबाबत गांभीर्याने विचार व  कृती सर्वच पातळ्यांवर होणे गरजेचे वाटते.
सर्वच प्रश्न हे सरकारने सोडवले पाहिजेत या मानसिकतेतून बाहेर पडून या प्रश्नाचा विचार प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर करण्याची ही वेळ आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आपल्या हिताचे नक्कीच आहे,  पण आपले हित कशात आहे व कशात नाही याची योग्य निवड देखील तितकीच महत्वाची ठरते.


 कृती व विचारार्थ.....

                                                 दीपक एम. भारती


अर्थशास्त्र विभागाच्या वतीने Student`s Seminar व समूह चर्चा संपन्न

  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई, अर्थशास्त्र विभाग  अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  Student`s   ...